महापुरुष श्री अच्युतानंद दास आणि महापुरुष श्री जगन्नाथ दास यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी-   भविष्य मलिकेच्या "श्री कृष्ण गरुड संवाद" मध्ये प्रभूंची वाणी - पुरीच्या पवित्र भूमीतून (श्रीक्षेत्र) भक्तांना अशी संकेत येतील ज्यामुळे कलियुगात मी मानवी शरीरात अवतार घेतला आहे असा पवित्र भक्तांना विश्वास वाटेल.   गरुड पुन्हा प्रभुंना विचारतो की हे जगत्पती, कृपया मला सांगा की मला दुसरे कोणते संकेत दिसतील ज्याने मला विश्वास वाटेल की आपण मानव शरीर धारण केले आहे?   भगवन म्हणतात -   समुद्र रूबातासोजे उठिन आसीब। कल्पवट डाल मोर भांगीब पोकाइब।।   ब्रह्म प्रलयाच्या वेळी कल्पवटाच्या ज्या फांदीमध्ये भगवान बालकाच्या रूपात विसावले आहेत, तिची फांदी समुद्राच्या वादळामुळे तुटून पडेल.   अउ बतासरे चक्र वक्र हेबो निलचक्र मोरो।   समुद्रातून वादळ उठेल आणि त्या भीषण वादळामुळे संपूर्ण मंदिराचा शिखर वाकलेला (वक्र) होईल (हे संकेत 2019 मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या भीषण चक्रीवादळाने पूर्ण केले आहेत आणि याला ओडिशा सरकारची पुष्टी मिळाली आहे. ही बातमी दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांमध्ये आली   पुन्हा भगवान भक्त गरुडजी यांना म्हणतात कि, जगन्नाथ पुरी क्षेत्र वरून एकामागून एक आणखी चिन्हे येत राहतील.   देउल रचुन छाड़ीब चक्र वक्र होइब।  मालिहा होइब भारत अंक काटाउथिब।।   अर्थात   माझ्या श्रीमंदिरापासून (जगन्नाथ मंदिर) कलियुगाच्या शासन यंत्रणेच्या पुरातत्व विभागाने मंदिराला प्राचीन काळापासून समुद्राच्या खाऱ्या हवेपासून वाचवण्यासाठी चुन्याचे प्लास्टर केले होते, त्या चुन्यापासून दिलेला लेप काढला जाईल (हे काम पुरातत्व विभागाने 1985 नंतरच करण्यात आले होते.) जय जगन्नाथ